Sunday, December 23, 2012

मधमाश्यांचे राष्ट्रगान

This poem was written on 2nd of Jan 2009. I am uploading it and keeping it on the Top of the Blog . All new posts shall be posted below this .

मारता कुणी जरी काडी खडा लहानाहून लहान
तुटून पडती त्यावर मधमाश्या घोंघावत राष्ट्र्गान//

मरमर करते अथांग गर्दी लोकल मध्ये चढण्या उतरण्याची
गोळीबार होताच पळते सैरावैरा घाबरट सश्या सारखी //

नि:शस्त्र मावळे धावून गेले चिलखतही नव्ह्ते सोबतीला
हौतात्म्याचा बाजार मग मांडला मेणबत्त्या अन म्य़ाराथोनचा //

मस्तवाल राजकारणी,गाफील गुप्तचर राज्य करती गांडुळ जनते वर
अळ्या,झुरळे दिवसाउजेडी बघा जंतही झळकती च्यानेलच्यानेल वर//

हैवान १० व बौम्ब १००, हातगोळे १०००,गोळ्या १०००० फक्त जेंव्हा होत्या
पायात शेपट्या एक करॊड महानगराच्या सगळ्या टी.व्ही.समोर तेंव्हा होत्या//

धावुन नि:शस्त्र लोंढा जरी कोसळता कसाब कंपनी वरती
जीव नसते गेले इतके अन बचत देखील वेळेची होती //

तत्क्षणीच आग्यामोहोळासम तुटून पडाया शिकवेल कोण कधी आम्हा
वाट न पहाता ATS अन NSG येईल कधी अन करतील काही केंव्हा //

बिशाद त्यापुढे कुणाची काय असती करण्या नजरही वाकडी
देत बसा आयुष्य भर त्यांना आता पुराव्यांचीच पोतडी //

चुकलेच तुझे देवकी नंदना अश्वासने देणे पुन:पुन: येण्याची
षंढ देश पांघरूणात चघळतो मनोराज्ये तुझ्या आगमनाची //

येतील का पुढे मालक अन राजे करणे सोडून देशाची होळी ?
अंबानी टाटा अन मुख्यमंत्री करतील स्पर्धा खाया पहीली गोळी ? //

गरज न पडेल कधीच आम्हा पगारी हुतात्मे अन नवश्या भगवंताची
जागा खडबडून जर का होई प्राण स्वत:चा अर्पिण्या हरेक भारतवासी //

सोडून द्या भेसूर भीषण नामर्द निर्बुद्ध किडामुंग्यांचे गुणगान
यापुढे गाऊ गगन भेदी स्वरात केवळ मधमाश्यांचे राष्ट्रगान //


I proudly dedicate my own creation , the one I like the most, "The Anthem of the Bees" to the Real Hero Rashida and Rukhsana of Jammu n Kashmir who showed the spirit of this Anthem and killed terrorists. May we all always respond like them .

Click Here to see VDO clipping About Great Bravery by Rashida and Rukhsana

3 comments:

Ashintosh said...

कवितेतल्या भावन्या पोहोचल्या. विशेषतः मेणबत्त्या व म्य़ाराथोन.

पण,
धावुन नि:शस्त्र लोंढा जरी कोसळता कसाब कंपनी वरती
जीव नसते गेले इतके अन बचत देखील वेळेची होती //

हे पटत नाही.

शिवाय कवितेखालील समर्पण रशिदा व रुख्साना (त्यांच्या शौर्याला कुठेही कमीपणा न आणता) किंचित खटकले. त्यांनी जे केले ते त्यांच्या परिवारासाठी असे म्हटले तरीही त्याला कमी पणा येत नसावा. पण त्याला राष्ट्रीयत्वाचा मुलामा (राष्ट्रगान हा संदर्भ म्हणून) देण्याची गरज आहेच असे नाही. माणूसकीच्या भावनेने समोरच्या साठी स्वतःचा जीव धोक्यात घालणे देखील तितकेच प्रार्थनीय आहे.

http://mr.upakram.org/node/2138#comment-34395

Anonymous said...

अगदी बरोब्बर!
हे पटण्या सारखी सामजीक मानसीकता नाही.
आणि कवीची हीच खरी खंत असावी.
हे जर पटले असते, तर वास्तवात आले असते.
कर्म हे शब्दां पेक्षा श्रेष्ठ असते.

असे जर झाले असते , तर कदाचीत ,ही कविता जन्मायला कारण ही राहीले नसते.
आणि
रशिदा आणि रुख्साना यांचे कार्य वास्तवातील उदाहरण ठरले नसते.
नव्या बातमी नुसार,त्यांना पगारी करून घेण्याने सरकारला पुण्य प्राप्तीचे समाधान लागेल.
पण कदाचीत,हा सौदा मधमाश्यांचे रूपांतर किड्या मुंग्यां मधे करील.
संधीसाधू मनोव्रुत्ती दुसरे काही करू शकत नाही.

anant yeolekar said...

i do appreciate your apt expression.we people write and write though nothing gets changed. i am with print media since last 33 years,there is a sea change in last two decades.thanx for sharing your vies.